खते काळ्या बाजारात जाण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे कठोर आदेश

अमरावती, २ सप्टेंबर: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील खतांच्या काळ्या बाजारावर आळा बसवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. खतांच्या उपलब्धतेचा, पुरवठ्याचा आणि गैरवापराचा आढावा घेताना त्यांनी सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत मुख्यमंत्री नायडू यांनी खतांची टंचाई होऊ नये यासाठी पुरवठा साखळी प्रभावीपणे नियंत्रित ठेवण्यावर भर दिला. “खते काळ्या बाजारात वळवली जात आहेत, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करा,” असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेवर खते मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना माफ करण्यात येणार नाही. त्यांनी खते वितरणात पारदर्शकता ठेवण्याचे आणि जिल्हानिहाय तपासणी करण्याचे आदेश दिले.

राज्यातील काही भागांत खते काळ्या बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संबंधित विभागांना निरीक्षण वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आता काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांना वेळोवेळी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, खते वेळेवर आणि योग्य दरात उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish